Friday, November 5, 2010

मला ’खाऊ’ द्या !!!

दिवसेंदिवस खाऊगिरी वाढतच चाललिये. प्रत्येकजण खायला कसे मिळेल ह्याच शोधात आहे. तुम्ही म्हणाल, मग त्यात चुकीचे काय आहे? मी अन्न खानार्यांविषयी बोलत नाहीये तर पैसे खानार्यांविषयी बोलतोय. भ्रष्टाचाराविषयी बोलतोय.
भारतात तर अश्या ’मला ’खाऊ’ द्या आणी तुम्ही पण खा’ व्रुत्तिच्या लोकांची संख्या वाढतच चाललीये. भ्रष्टाचार हाताबाहेर गेलाय. याच खापर राजकार्ण्यांच्या डोक्यावर फोडल की झाल. हो, राजकारणी लोक, सरकार याला जवाबदार आहे. किती उदाहरण देवु? आज महाराष्ट्रातला ’आदर्श’ घोटाळा, चारा घोटाळा, बोहोर्स घोटाळा, ऑलंपिक घोटाळा. अशी हजारो उदाहरणे आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर या देशात सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने राज्य केले. मग भ्रष्टाचाराची जवाबदारी कॉंग्रेसची. आज भारत जगातला ८७ नंबरचा भ्रष्टाचारी देश झालाय (१ नंबर म्हणजे कमी भ्रष्टाचारी, http://www.nationmaster.com/graph/gov_cor-government-corruption). देशात आज एकही असा पक्ष नाही जो भ्रष्टाचार मुक्त भारत देण्याच्या मुद्द्यावर निवड्णुक लढवतोय. का?
याला जवाबदार आहेत देशाचे नागरीक. गाढवांच सरकार गाढवच. जसे नागरीक तसे सरकार. भ्रष्टाचार संपवण्यास अक्षम (खर तर भ्रष्टाचार पसरवणारे) सरकार इतके वर्ष निवडुन कसे येते? आपल्यासाख्या गाढवांमुळेच ना? म्हणुन याच खर खापर आपण पहिल्यांदा स्वता:च्या डोक्यावर फोडायला हवे.
प्रत्येकजण स्वत:च काम लवकर करून घ्येण्यासाठी, जास्त पैसे मिळवण्यासाठी भ्रष्टाचार वाढवायला हातभार लावतोय. शिक्षण हे आज फक्त माणसाला शिक्षित बनवत आहे, त्याला पैसे कमवाया शिकवत आहे. पण ते माणसाला सुशिक्षित, सुसंस्कारी बनवत नाहीये. मुलाला शाळेत घेण्याकरता सुद्धा शाळा डोनेशन घेतात. ह्या शाळा काय घडवणार आदर्श नागरीक? असल्या शाळेतुन शिकलेले फक्त ’आदर्श’ घोटाळे करु शकतात. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार बंद करु शकत नसाल तर कायदेशिर तरी करा म्हनुन सरकारचे कान ऊपट्ले आहेत (सामना, बातमी शेवटी चिटकवली आहे).
हे सर्व जर असेच चालु राहिले तर, भारत देश ’महासत्ता’ नाही बनला तरी ’महाभ्रष्टाचारी’ देश नक्कीच बनेल.
भ्रष्टाचार संपण्यासाठी बरेच उपाय आहेत. गरज आहे ती इच्छाशक्तीची. स्वत:पासुन सुरुवात करा. स्वत:पुरते न थांबता, बाकीच्यांनाही सांगा. देशात चांगले सरकार आणण्याकरता प्रयत्न करा. असे बरेच ऊपाय आहेत. देशाला भ्रष्टाचारापासुन वाचवले नाही तर विनाश अटळ आहे.

लक्ष्मीपुजनाच्या मुहुर्तावर लक्ष्मीला एवढच मागण की, तु तुझ्या भ्रष्टाचारी भक्तांना कधीही प्रसन्न होवु नकोस आणी ह्या देशाला, जगाला भ्रष्टाचारापासुन मुक्त कर!!!

वंदे मातरम्‌,
नरेंद्र

(कोणत्याही खादाड्खाऊ गाढवाच्या जर ’आदर्श’ भावना ह्या लेखाने दुखवल्या असतील तर त्याची जवाबदारी त्याने स्वत: घ्यावी व पुन्हा ’खाऊ’गिरी करु नये.)


Sunday, April 25, 2010

भाग २ - सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!!

(या लेखाच्या शेवटी चिटकवण्यात आलेली सामन्यातला लेख जरुर वाचा)
नुकताच सामना व्रुत्तपत्रात लेख प्रसिद्ध झाला - धर्मनिरपेकक्षतेच्या कल्पनेला सुरुंग. या लेखातुन सच्चर समितीचा अहवाल आणी सरकारकडुन मतांसाठी केले जाणारे धार्मिक लाड यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. माझ्या "सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!! " या लेखाचा भाग १ हा याच विषयावर आहे.

आज प्रत्येकजण घाम गाळुन, रक्त आटवुन कष्ट करतोय. कमवलेल्या पैश्यातला काही भाग हा राष्ट्राच्या विकासाकरता देतो.  धर्मनिरपेक्ष, भेदभाव न करता, नि:स्वार्थ भावनेने त्या पैश्याचा उपयोग हा देशाच्या विकासाकरता करणे हे सरकाचे प्रथम कर्तव्य. पण आज हेच पैसे फक्त धर्म पाहुन मुस्लिमांकरता वापरले जात आहेत.  हिंदुनी आणी बाकीच्या धर्माच्या लोकांनी धर्मांतर करावे, असे सरकारला यातुन सुचवायचे आहे का? हज यात्रेकरता अनुदान दिले जाते, अमरनाथसाठी पोलिसांच्या लाठ्या. मुस्लिमांना देता मग बाकीच्या धर्माच्या लोकांना पण द्या, असा याचा अर्थ नाही. धर्मनिरपेक्ष रहा व कुणाचेच धार्मिक लाड करु नका.

आज जातीच्या आधारावर आरक्षण आहे, कारण अमुक एका जातीचा म्हनुन त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलता. स्त्रियांना आरक्षण दिले गेले, कारण स्त्रि म्हणुन समाजाने त्यांना प्रगतीपासुन वंचित ठेवले. पण मुस्लिम म्हनुन, त्यांचा धर्म पाहुन समाजाने त्यांना कधी शिक्षणापासुन, प्रगतीपासुन वंचित ठेवले होते का? आणी जातीच्या आरक्षणात मुस्लिम जातीही समाविष्ठ आहेतच, मग परत वेगळे धार्मिक आरक्षण का? हे सगळे मतांसाठीचे राजकारण आहे. जातींचे राजकारण चालुच होते, आता धर्माचेही चालु झाले. मुस्लिम लोकसंख्या जास्त म्हणुन कोणत्या क्षेत्राला सरकारने विकासापासुन वंचित ठेवले होते का? भिवंडीमध्ये पोलिस स्टेशन बांधु नये म्हणुन दोन हिंदु पोलिसांची निर्घुन हत्या मुस्लिमांनी केली. तरीपण फक्त मुस्लिम क्षेत्राच्या विकासासाठी सरकार खर्च करतेय. सच्चर समितीच्या नावाखाली सरकारने जनतेची बरीच फसवणुक केली आहे, मी फक्त मोजकीच उदाहरणे इथे दिली आहेत.

अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी सरकार एवढ लांगुलचालन करत आहे, मग बहुसंख्यांकाच्या मतांची काळजी सरकारला का नाही? कारण कदाचित सरकार, बहुसंख्याकातले बहुसंख्य हे गाढव आहेत असे मानते. व कदाचित ते योग्यही आहे, कारण गाढवांच सरकार हे गाढवच असणार. ’मला काय त्याचे’! याच भावनेने आज हा दिवस दाखवला आहे. हा लेख, याचा भाग १ पुर्णपणे वाचल्यावर पण आपली ’मला काय त्याचे’ हिच भावाना असेल तर आपला, आपल्या पुढच्या पिढीचा व देशाचा विनाश अटळ आहे!

जय हिंद,
नरेंद्र

सामना २२ एप्रिल २०१० -